‘फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात भ्रष्ट सरकार’ - अनिल गोटे

Thote Shubham

 देवेंद्र फडणवीस सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात भ्रष्ट सरकार आहे. गेल्या पाच वर्षात सर्वात भाजप सरकारने हजारो कोटींचे घोटाळे केले. असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. मी जे बोलत आहे ते अगदी जबाबदारीने बोलत आहे. मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. गोटे म्हणाले, फडणवीस सरकारने समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार केला. शिवस्मारकाच्या कामात हजारो कोटींचे घोटाळे केले. हे घोटाळे समोर आले तर अख्खा महाराष्ट्र भाजपला पायताणाने मारेल. भाजपकडे सर्वात जास्त पैसा आहे. म्हणून तर इतके घोटाळे करत आहे. असेही त्यांनी यावेळी संगीतले.

 
 
तसेच, जर भाजप शिवसेना महायुतीला जनादेश मिळूनही शिवसेनेने भाजपला दगा दिला असेल तर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असता. मात्र महाविकास आघाडीचे जे सरकार राज्यात स्थापण झाले आहे. त्याला जनतेने शांततेत स्वीकारले. याचा अर्थ असा होतो की राज्यात जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असेही गोटे यावेली म्हणाले.                                         
 
 

Find Out More:

Related Articles: