मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता तरी मदत द्या’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Thote Shubham
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलीये. 

फडणवीस म्हणाले, बांधावर जाऊन आपण जी मदत जाहीर केलीये तशी मदत कधीतरी मिळेल अशी शेतकर्‍यांना आस आहे.

निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यावेळी मदत मिळाली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तरी द्या, असं फडणवीस म्हणाले आहेत. 

                 
                                   

Find Out More:

Related Articles: