न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी राहुल गांधी हाथरसमध्ये जात आहेत- स्मृती ईराणी

Thote Shubham
हाथरस बलात्कार प्रकरणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष उत्तर प्रदेशच्या योगी सरकार आणि बीजेपी सरकारवर हल्लाबोल करीत आहे. आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटूंबियाची भेट घेण्यासाठी हाथरसला जाणार आहे.  

त्यांच्या या दौऱ्यावरती केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी टिका केली आहे. हाथरसमध्ये राहुल गांधी केवळ राजनीती करण्यासाठी जात असल्याचा घाणाघात स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

स्मृती ईराणी म्हटले आहे की,'जनता काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे ओळखते, 2019 मध्ये जनतेने बीजेपीला बहुमक दिले. जनतेला माहिती आहे की, हाथरसमध्ये राहुल गांधी पीडितेच्या न्यायासाठी नव्हे, तर आपल्या राजकारणासाठी जात आहे.

 जर कोणाला या विषयावर राजनीती करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी मी त्यांना थांबवणार नाही' अशी टिका स्मृती ईराणी यांनी राहुल गांधीवर केली आहे.

दरम्यान आज खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेणार आहे. मात्र त्यांच्या या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून टिका केली जात आहे.

https://mobile.twitter.com/AHindinews/status/1312289412240216064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1312289412240216064%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F

Find Out More:

Related Articles: