'म्हणून युतीसाठी तडजोड केली'; उद्धव ठाकरेंची कबुली

Thote Shubham
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली. २८८ पैकी १६४ जागांवर भाजप आणि १२४ जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे. शिवसेनेला मिळालेल्या या जागांवर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी युती करताना तडजोड केल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युती करण्यामागची कारणं स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या जनतेचा युतीला कौल आहे.

त्यामुळं युती केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
जागावाटपात समसमान नसलो तरी निवडणूक निकालानंतर सत्तेचा वाटा समसमान असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भविष्यात युती तुटणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

                                                                                                                                                                                                  

Find Out More:

Related Articles: